मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प लोककल्याणकारी असून, त्यामुळे राज्यातील जनतेचे हित जोपासले गेले आहे अशा शब्दांत विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले.
विधानसौधसमोर प्रसारमाध्यमांशी बोलताना चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, शेतकरी, मागासवर्ग, महिला अशा विविध घटकांसाठी अर्थसंकल्पात चांगल्या तरतुदी केल्या आहेत. विशेषतः महिला व बालकल्याण विभागाला ९० कोटी निधी देऊन जुनी मागणी पूर्ण केली आहे. त्याशिवाय राज्यात नव्या एक हजार अंगणवाडी इमारती उभारण्यासाठी निधीची तरतूद केली आहे, हे स्वागतार्ह आहे.
अर्थसंकल्पात महिला व बालकल्याण विभागाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. विभागाच्या कार्यक्रमासाठी आणि इतर लोकस्नेही प्रकल्पांसाठी 86 हजार 423 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. ते म्हणाले की, मुलांसाठी लक्ष्यित कार्यक्रमांसाठी 54 हजार 617 कोटी रुपये देण्यात आले आहेत. सर्व घटकांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. राज्यातील जनतेचे हित जोपासणारे बजेट मुख्यमंत्र्यानी मांडले आहे.


Recent Comments