Bagalkot

स्कूल बस-ट्रॅक्टर अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

Share

बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील अलगुरु गावात शालेय विध्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला झालेल्या भीषण अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

जमखंडी तालुक्यातील अलगुरु गावाजवळ मध्यरात्री 12 वाजता स्कूल बस आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातात एका विद्यार्थिनीसह चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत आठहून अधिक मुले जखमी झाली आहेत. जखमींना जमखंडीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सागर कडकोळ (वय १७), श्वेता (वय १३), गोविंद (वय १३) आणि बसवराज (वय १७) अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत.

मृत विद्यार्थी हे मूळचे कवटगी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. ते सर्व अलगुरु गावाजवळील श्री वर्धमान महावीर शैक्षणिक संस्थेत शिकत होते. शैक्षणिक संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून ते स्कूल बसने कवटगी गावाकडे निघाले असता ही दुर्घटना घडली.

Tags: