Belagavi

नैतिक पोलिसगिरीतील संबंधितांवर करावी कडक कारवाई : माजी मंत्री ईश्वरप्पा

Share

बेळगावात मुस्लीम गुंडांचे नैतिक पोलिसिंग हे आश्चर्यच आहे.राज्यात सरकार जिवंत आहे की मेले हेच कळत नाही. सरकारने तपासासाठी तपास पथक बेळगावला पाठवावे, अशी विनंती मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री परमेश्वर यांना करत आहे, असे माजी मंत्री ईश्वरप्पा म्हणाले.

बेळगावमध्ये एका तरुणासहित तरुणीला बेदम मारहाण करून नैतिक पोलिसगिरीचे दर्शन घडवणाऱ्या घटनेची माजी मंत्री ईश्वरप्पा यांनी माहिती समजल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला भेट दिली आणि मारहाण झालेल्या तरुण तरुणीला धीर दिला.

बेळगावात मुस्लिम गुंडांचे नैतिक पोलिसिंग आश्चर्यकारक होते. तो मुलगा लमाणी आहे आणि मुलगी मुस्लिम आहे, ते नात्याने भाऊ बहीण आहेत . युवा निधीचा अर्ज करण्यासाठी ते बेळगावला आले होते . मात्र ऑफिसमध्ये गर्दी असल्याने ते बाहेर पडले . या मारहाणीमुळे तरुणाला मानसिक धक्का बसला आहे . राज्यात सरकार आहे की मेले हेच कळत नाही. तरुणावर रॉडने हल्ला करण्यात आलाआहे .

मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री परमेश्वर यांना आवाहन करत आहे. तपासासाठी बेळगावला तपास पथक पाठवावे . पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करू देणे आणि शांत बसणे योग्य नाही. त्यांना अटक करून न्यायालयात पाठवून जामीन मिळाल्यास अशा घटना पुन्हा घडतील. अशाप्रकारे 70 ते 80 जणांना अशाप्रकारे मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे अशा घटना पुन्हा घडू नयेत.समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मारहाण झालेल्या तरुणाला अडीच लाखांची मदत दिली जाणार असल्याचे सांगितले आहे. सरकारने मुला-मुलींना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असे माजी मंत्री ईश्वरप्पा म्हणाले

Tags: