राज्यातील दुष्काळ निवारणाबाबत चर्चा करण्यासाठी मी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.
बेंगळुरूमध्ये आज प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी उद्या सकाळी 11 वाजताची वेळ दिली आहे. त्यांना जाऊन भेटणार आहे. दुष्काळ निवारणाच्या मुद्द्यावर मी त्यांना भेटायला जात आहे. या भेटीत त्यांच्याशी दुष्काळाबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच काँग्रेस कार्यकारिणीची उद्या दिल्लीत बैठक आयोजित केली आहे. त्यात मी सहभागी होणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक आणि निगम-महामंडळ अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत हायकमांडशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केरळमध्ये कोविडच्या नव्या विषाणूबाधीत रुग्णांची संख्या वाढल्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली, केरळमध्ये प्रकरणे वाढत आहेत. मी आमच्या आरोग्यमंत्र्यांना बैठक घेण्यास सांगितले आहे. आरोग्यमंत्र्यांना तातडीने बैठक घेऊन खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments