मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भगवी शाल आणि भगवा फेटा घातला तर ते काढून टाकतात. मतांसाठी बंधुभाव दाखवतात. परंतु कुर्बानी देणाऱ्या धर्मगुरूंशेजारी मात्र रुबाबात बसतात अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री अश्वत्थ नारायण यांनी केली.
काँग्रेसवाले म्हणजे जातीयवादी. जे जबाबदार पदावर आहेत त्यांनी विचार करून कार्यक्रमाला जावे. जबाबदारी विसरून केवळ राजकारण करू नये. काँग्रेस मन मानेल तसे सरकार चालवीत आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यात सरकारला आलेले अपयश उघड करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था बिघडल्याबद्दल आम्ही प्रश्न करत आहोत, असे ते म्हणाले.
उत्तर कर्नाटकच्या विकासाबाबत बोलण्याची विनंतीही आम्ही केली आहे. हमी योजनेसाठी एसपीईटीचे 11 हजार कोटी वापरले जात आहेत. हमी योजनेत समाविष्ट असलेल्या विभागांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. ‘विकास’ हा शब्द हमी योजनेत नाही, अशी टीका अश्वत्थ नारायण यांनी केली.


Recent Comments