खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी धारवाड विवेकानंद नगर रहिवासी संघटनेच्या सदस्यांनी धारवाड विवेकानंद नगर गार्डनजवळ आंदोलन केले.
गेल्या ३४ वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. रस्ता अत्यंत खराब असून दर्जेदार काँक्रिटचा रस्ता तयार करावा, अशी मागणी आंदोलक स्थानिकांनी केली.
विवेकानंद नगर, धारवाड मधील मुख्य रस्ता आणि उपरस्त्यांचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करावेत. विवेकानंद नगर मुख्य रस्ता हा शक्तीनगर, गांधीनगर, कलघटगी बायपास रोड, रजत गिरी, विद्यागिरी इत्यादी महत्वाच्या भागांना जोडतो.
त्यामुळे हा रस्ता जनतेसाठी दररोज आवश्यक आहे. आंदोलक स्थानिक रहिवासी हंसराज अंगडी यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे आवाहन करूनही रस्त्याच्या विकासाला सुरुवात झाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.


Recent Comments