उडुपी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हाती घेतलेल्या कामात विलंब न लावता सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. चुका आढळल्यास अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिला आहे.

उडुपी जिल्हा पंचायतीच्या डॉ. व्ही एस आचार्य सभागृहात आयोजित कर्नाटक विकास कार्यक्रमांच्या त्रैमासिक प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
बैंदूर तालुक्यातील मरवंते येथील बाह्य बंदर, गंगोली मासेमारी बंदराची पुनर्बांधणी आणि गांगोली मासेमारी बंदरातील कोडी जेट्टी जलवाहिनीतील नेव्हिगेशनची कामे तांत्रिक अडचणींमुळे वेळेत होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून त्यांनी ही कामे मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यात सरासरीपेक्षा 22 टक्के कमी पाऊस झाला असून पाण्याची पातळीही सरासरीपेक्षा 24 टक्के कमी आहे. येत्या उन्हाळ्यात लोक व जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी तातडीने घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत आमदार यशपाल ए सुवर्णा, व्ही सुनील कुमार, गुरुराज शेट्टी गंटीहोळे, आ. किरणकुमार कोडगी व गुरमे सुरेश शेट्टी, विधान परिषद सदस्य मंजुनाथ भंडारी, जिल्हाधिकारी डॉ. के विद्याकुमारी, जिल्हास्तरीय अंमलबजावणी अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments