Dharwad

कर्नाटक विद्यापिठाच्या कर्मचाऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

Share

हे राज्यातील एक प्रतिष्ठित विद्यापीठ आहे. अनेक पदवीधरांनी त्यांच्या भविष्यासह विद्यापीठाची प्रतिमा उंचावली आहे. मात्र अलीकडे विद्यापीठातील काही घटना प्रसारमाध्यमांमध्ये वारंवार बातम्यांमध्ये येत असतात. आता त्याच विद्यापीठात एका कर्मचाऱ्याने जीव देण्याचा प्रयत्न केला आणि हे विद्यापीठ पुन्हा चर्चेत आले आहे. कोण आहे तो कर्मचारी आणि त्याने हे टोकाचे पाऊल का

आत्मानंद बडिगेर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निवडणुकीच्या कामासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकार्‍यांनी बीएलओ कामासाठी 46 कर्मचारी नियुक्त केले आहेत. परंतु विध्यापिठामध्ये कर्मचारी कमी असल्याने कुलगुरूंनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून बीएलओ कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू नये, अशी विनंती केली आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने सध्या बीएलओ आत्मानंद बडिगेर यांची महानगरपालिकेत नियुक्ती केली. तेथील सावनूर या वरिष्ठ अधिकाऱ्याने आत्मानंद बडिगेर यांना अर्वाच्च्य शब्दांत अपमानित करून त्यांना निलंबित करण्याची धमकी दिली. त्यामुळे दुखावलेल्या आत्मानंद बडिगेर यांनी 18 नोव्हेंबर रोजी घरी येऊन विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने आत्मानंद बचावला असून गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर धारवाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटक विद्यापीठाच्या 46 हून अधिक कर्मचाऱ्यांची बीएलओ म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी आत्मानंद बडिगेर हे कर्नाटक विद्यापीठात लिपिक म्हणून कार्यरत होते. परंतु 18 नोव्हेंबर रोजी ते महाविद्यालयात विद्यार्थी भरतीमध्ये व्यस्त होते, मात्र येथे निवडणूक अधिकारी सावनूर यांनी महानगरपालिकेतून फोन करून आत्मानंद बडिगेर यांना अर्वाच्च्य शब्दात बोलून, पगार कापला जाईल, तुला नोकरीवरून निलंबित केले जाईल असे सांगून मानसिक छळ केला. त्यामुळे बडिगेर यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि आत्मानंद बडिगेर यांच्या उपचारांचा सर्व खर्च उचलावा, अशी मागणी केपीसीसी सदस्य रॉबर्ट दड्डापुरी यांनी केली आहे.

विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी बीएलओ म्हणून नियुक्ती करू नये, असे पत्र कुलगुरुंनी यापूर्वीच दिले होते. सध्या आत्महत्येचा प्रयत्न करणारा आत्मानंद धोक्यातून बचावला असून, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारीची गरज आहे.

Tags: