बँकेच्या अधिकाऱ्यांच्या छळामुळे शेतकरी महादेवप्पा जावूर यांनी आत्महत्या केली. त्यांचे कर्ज माफ करण्यासह त्यांच्या कुटुंबाच्या व शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी धारवाडमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला.

कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेना संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी धारवाड शहरातील कला भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून राज्य सरकार आणि बँक अधिकाऱ्यांविरोधात रोष व्यक्त केला.
धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यातील गुम्मागोळ येथील शेतकरी महादेवप्पा जावूर यांनी केव्हीजी बँकेच्या अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या केली. महादेवप्पा यांच्यावर केव्हीजी बँकेचे कर्ज होते. मात्र सध्या दुष्काळ असून शेतकऱ्याचे जगणे कठीण झाले आहे. अशा वेळी बँक अधिकारी कर्जफेडीच्या नावाखाली शेतकऱ्यांना मानसिक छळ करत आहेत. याशिवाय राज्य सरकार शेतकऱ्यांना पुरेशी वीज देत नसल्याने आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आम्हाला रस्त्यावर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे शासनाने व केव्हीजी बँकेने मृत शेतकऱ्याचे कर्ज तत्काळ माफ करावे, त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, अक्रम सक्रम वीज योजना सुरू ठेवावी. यासह पुरेसा वीजपुरवठा झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या अन्य समस्यांना सरकारने प्रतिसाद द्यावा. अन्यथा येत्या काळात तीव्र संघर्षाचा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.


Recent Comments