Dharwad

धारवाड कृषी विद्यापीठात 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान कृषी मेळावा

Share

‘शाश्वत शेतीसाठी तृणधान्ये’ या शीर्षकाखाली धारवाड कृषी विद्यापीठात 9 ते 12 सप्टेंबर या कालावधीत कृषी मेळावा होणार आहे.

कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पी. एल. पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन सांगितले की, 9 तारखेला सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते मेळ्याचे उद्घाटन होणार आहे. कृषीमंत्री एन. चलुरायस्वामी, जिल्हा पालक मंत्री संतोष लाड उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2.30 वाजता ‘शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांपर्यंत’ या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, 10 रोजी बियाणे मेळाव्याचे उद्घाटन, 11 रोजी अन्नधान्य पोषण व आर्थिक सुरक्षेबाबत चर्चासत्र व 12 रोजी चर्चासत्र, दुपारी 4 वाजता समारोप समारंभ होणार आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत 12 तारखेला होणाऱ्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

मेळ्यामध्ये कृषी आणि कृषी सहायक तंत्रज्ञान, हायटेक फलोत्पादन, फळ आणि फुलांचे शो, आश्चर्यकारक कीटक जग आणि पशुधन शो आयोजित केले आहेत. कृषी प्रदर्शनात 199 हायटेक स्टॉल्स, 351 जनरल स्टॉल्स, 24 मशिनरी स्टॉल्स, 40 फूड स्टॉल्स, 50 पशुधन प्रदर्शन स्टॉल्स आणि 10 फील्ड स्टॉल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यापीठाने संशोधन केलेल्या 24 नवीन वाण आणि 33 कृषी तंत्रज्ञान प्रसिद्ध केले जातील.

विद्यापीठाला प्रथमच उत्पादन विक्रीचा परवाना मिळाला आहे. 25 क्विंटल विविध जैव-खते पावडर आणि 2.6 हजार लिटर विविध जैव-खते द्रव, 16 क्विंटल जैव-कीटकनाशके कृषी मेळ्यात विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. पेरणीचे बियाणेही विकले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

Tags: