Education

पाल पडलेले दूषित अन्न खाल्ल्याने 30 विद्यार्थिनी अत्यवस्थ

Share

पाल पडलेले दूषित अन्न खाल्याने , ३० हून अधिक विद्यार्थिनीना उलट्या होऊन त्या अत्यवस्थ झाल्या आहेत .

ही घटना विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील रक्कसगी गावात घडली.

रक्कसगी गावातील कस्तुरबा गांधी मुलींच्या निवासी शाळेत ही घटना घडली. पाल स्वयंपाकात पडली मात्र हे लक्षात न आल्याने,

विद्यार्थिनींनी नकळत अन्न खाल्ले. त्यामुळे विद्यार्थिनी अत्यवस्थ झाल्या आहेत .

सध्या या विद्यार्थिनींना तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान,

मुद्देबिहाळचे आमदार सी.एस. नाडगौडा यांनी रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांकडून माहिती घेतली.

Tags: