आमचे सरकार कल्याण कर्नाटकला कधीच विसरणार नाही. या भागाच्या आणि संपूर्ण कर्नाटकच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.

कलबुर्गी येथे आज सरकारची महत्त्वाकांक्षी हमी योजना गृहज्योती योजनेच्या शुभारंभप्रसंगी ते आज बोलत होते. सिद्दरामय्या पुढे म्हणाले की, आमच्या सरकारच्या मागील काळात कल्याण कर्नाटकात 99,600 घरांसह 14,42000 घरे बांधण्यात आली. परंतु मागील सरकारने पाच वर्षांत केवळ 8 लाख घरे बांधली, त्यापैकी केवळ 19000 घरे कल्याण कर्नाटकात बांधली गेली. ते म्हणाले की, मागील सरकारचे योगदान केवळ हैदराबाद कर्नाटकचे नामकरण कल्याण कर्नाटक असे करण्यापुरते मर्यादित आहे अशी टीका त्यांनी केली.
सिद्रामय्या पुढे म्हणाले की, आमच्या सरकारने सांगितल्याप्रमाणे आम्ही केले आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेवर येताच मंत्रिमंडळाने पाच हमी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 11 जून रोजी ‘शक्ती’ योजना लागू करण्यात आली. आतापर्यंत 30 कोटींहून अधिक महिलांना शक्ती योजनेचा लाभ झाला असून सुमारे 50 लाख महिला दररोज मोफत प्रवास करत आहेत. या प्रकल्पामुळे राज्यातील महिला खूश असल्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आनंद व्यक्त केला
बाइट सीएम सिद्धरामय्या
युनिव्हर्सल बेसिक इनकम या संकल्पनेअंतर्गत पाच हमी योजना तयार करण्यात आल्या असून आम्ही कर्नाटक मॉडेलची सुरुवात कर्नाटकात करणार आहोत. महात्मा गांधी म्हणाले की गरीबी हा हिंसाचाराचा सर्वात वाईट प्रकार आहे आणि गरीब आणि श्रीमंत यांच्यात असमानता आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आम्ही देत असलेला 7 किलो तांदूळ कमी करून 4 किलोवर आणला. अन्नभाग्य योजनेंतर्गत तांदूळ देण्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य न केल्याने 5 किलो तांदूळऐवजी 170 रुपये निधी सर्व लाभार्थ्यांना दिला जात आहे असे एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.
बाईट मल्लिकार्जुन खर्गे.
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, बेरोजगार पदवीधर आणि पदविकाधारकांसाठी युवानिधी योजना सरककारकडून राबविण्यात येणार आहे. हमी योजनांच्या अंमलबजावणीमुळे विकास कार्यक्रमांवर परिणाम होणार नाही. हमीभावाच्या अंमलबजावणीबरोबरच आम्ही राज्याचा विकासही करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार.यावेळी ऊर्जा मंत्री के जे जॉर्ज, कलबुर्गी जिल्हा पालक व ग्रामविकास व पंचायत राज मंत्री प्रियांक खरगे, मंत्री ईश्वर खांड्रे, रहीम खान, शरणप्रकाश पाटील दर्शनापूर, आमदार अल्लमप्रभू, कनीज फातिमा, बी.आर.पाटील, एम.वाय. पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments