सदाशिव नगर शेवटचा क्रॉस येथे नाल्याचे सांडपाणी निचरा होण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे घरांमध्ये हे घाण पाणी शिरल्यावर महानगरपालिका जागे होणार आहे काय असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे. मनपाने पावसाळ्यापूर्वीच तातडीने हे काम करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी केली आहे.
फेब्रुवारी महिन्यात वार्ड क्रमांक 25 मधील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी उपमहापौर रेश्मा पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नाला स्वच्छता करावी याबाबत चर्चा केली होती. या गोष्टीला तीन महिने उलटूनही अजून पर्यंत जैसेथेच परिस्थिती आहे. त्यामुळे महानगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळा सुरु व्हायला केवळ एक महिना शिल्लक आहे. त्यामुळे तातडीने नाला सफाई करून देण्याची गरज आहे.
आता नवीन सरकार अस्तित्वात आले आहे, आता तरी महानगरपालिका विकास कामे सुरू करावी. नवीन आमदारांनी या कडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी प्रसाद चौगुले व सदाशिवनगर सदाशिव नगर शेवटचा क्रॉस रहिवाशांनी केली आहे.
Recent Comments