जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा स्वीप समिती, तालुका पंचायत आणि तालुका स्वीप समिती यांच्या सहकार्याने कित्तूर शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये शनिवारी मतदार जागृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बाईक रॅली काढण्यात आली.
कित्तूर मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी रेश्मा हनगल आणि तालुका स्वीप समितीचे अध्यक्ष, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी सुभाष संपगावी यांनी कित्तूर शहरातील चन्नम्मा सर्कल येथून बाईक रॅलीला ग्रीन सिग्नल दाखवून सुरुवात केली.
त्यानंतर बोलताना निवडणूक अधिकारी रेश्मा हनगल म्हणाल्या, ‘मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे आणि कोणत्याही अमिषाला बळी न पडता नैतिकतेने मतदान करून लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे.’
तालुका स्वीप समितीचे अध्यक्ष, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी , सुभाष संपगावी म्हणाले, मतदारांनी प्रामाणिकपणे आणि नि:पक्षपातीपणे मतदान करावे. ते प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रत्येकाने चूक न करता मतदान केले पाहिजे, तेव्हाच मतदानाच्या माध्यमातून सुरक्षित लोकशाही राष्ट्र उभारता येईल, असे ते म्हणाले.
सहायक निवडणूक अधिकारी, तहसीलदार रवींद्र हादिमनी, क्षेत्र शिक्षणाधिकारी आर.टी.बलिगार, तालुका पंचायत सहाय्यक संचालक सुरेश नागोजी व लिंगराज हलकर्णीमठ, तालुका पंचायत कार्यालयाचे कर्मचारी, विकास अधिकारी व विविध ग्रामपंचायतींचे सचिव सहभागी झाले होते.


Recent Comments