शिरूर आणि गुम्मगोळ गावादरम्यान लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे कॅंटर वाहन रस्त्यावर उलटले. या वाहनातील १५ ते २० जण जखमी झाले आहेत .

हे वाहन धारवाड तालुक्यातील तिम्मापुर गावाकडून नवलगुंद तालुक्यातील बल्लूर गावाकडे जात होते. यावेळी नवलगुंद तालुक्यातील शिरूर ते गुम्मगोळ रस्त्याच्या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली.त्यामुळे वाहनातील सुमारे 15-20 जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना नवलगुंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.


Recent Comments