द्वेष पसरवणाऱ्या आणि मुस्लिम समाजाला भडकावणाऱ्या मौलवी आणि नेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कायदे करण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धारवाडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
हिंसाचार भडकावणारे वेगवेगळ्या नावाने उदयास येत आहेत. सिम्मी, पीएफआय, सिटीझन फोरम हे नावापुरतेच आहेत. पण, इथे जिहादी विचारधारा प्रेरित करते. हे रोखण्यासाठी आवश्यक कायदा केला पाहिजे. द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यात मदरशांचे योगदान मोठे आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे, या मागणीचे निवेदन आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना दिले.


Recent Comments