देश सुरक्षित व्हायचा असेल तर शेतकऱ्याचे जीवन समृद्ध झाले पाहिजे. कष्टकरी शेतकरी गरीब असतो. हे आपल्या कुशासनाचे लक्षण आहे. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव नाही. त्यामुळे शेतकरी गरीब होत आहे. हे सर्व आपल्या सरकारमुळे आहे असा आरोप राज्य रयत संघटनेचे उपाध्यक्ष शिवानंद मुगळीहाळ यांनी सांगितले.
शुक्रवारी अंकलगी येथे कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसिरू सेना गोकाक तालुका शाखेच्या वतीने आयोजित शाल दीक्षा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाध्यक्ष राघवेंद्र नाईक म्हणाले की, संघटनांमुळे जीवन समृद्ध होऊ शकते. सरकारच्या गलथान कारभारामुळे शेतकरी तोट्यात असून दिवसेंदिवस त्याची अधोगती होत आहे हे आपले दुर्दैव आहे.
शूद्र शक्ती प्रदेश सरचिटणीस व शेतकरी नेते जगन सीके यांनी संघटना व भविष्यातील संघर्ष याविषयी सांगितले. उत्तर कर्नाटक रयत संघटनेचे कार्याध्यक्ष महेशगौडा सुभेदार यांनीही यावेळी विचार मांडले.
मोहन माळगी, प्रदेशाध्यक्ष, चुनप्पा पुजेरी, राजू मडवाळ, इरण्णा संपगावी व्यासपीठावर उपस्थित होते. तालुकाध्यक्ष मंजुनाथ पुजेरी यांनी स्वागत केले. अंकलगी गावातील शेतकरी नेते बुद्धवंत तिळगंजी, बसलिंगप्पा शबावी, सन्नाप्पा सनदी, बसवराज चिकनवरा, अडीवेप्पा कमतगी, बसप्पा नाईक, मौलासाब हवालदार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


Recent Comments