Belagavi

श्रीनगर येथील झोपडपट्टी रहिवाशांचा सर्व्हे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांविरोधात संताप

Share

बेळगावमधील श्रीनगर येथील आश्रयघरचें सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांविरोधात इथल्या झोपडपट्टीवासीयांनी संताप व्यक्त केला आहे.

होय, मंगळवारी श्रीनगरमधील आश्रयघरांचे सर्वेक्षण करण्यासाठी अधिकारी गेले होते . यावेळी ते आश्रय घरांमध्ये राहणाऱ्या लोकांची तपासणी करत होते. यावेळी झोपडपट्टीतील रहिवाशांनी अधिकाऱ्यांकडे योग्य सर्वेक्षण करण्याची मागणी केली.

दरम्यान, श्रीनगरचे रहिवासी मल्लेश हेलवर यांनी आमच्या आपली मराठीशी संवाद साधला, त्यांनी सांगितले की, त्यांचा जन्म श्रीनगर झोपडपट्टीत झाला आहे आणि एकरूप कौर मॅडमच्या कार्यकाळापासून आम्ही इथे राहत आहोत . तेव्हापासून आम्ही कोणत्याही समस्येशिवाय जगत आहोत. पण आता आमच्यावर खूप अन्याय करत आहेत. सर्वेक्षण दहा वेळा केले जाते. आमच्या लोकांना इथे घर मिळाले नाही, बाहेरच्या लोकांना घर मिळाले आहे. 39 घरे आहेत, आमदारांनी एकत्र येऊन यादी तयार केली आहे. उद्या आमच्या झोपडपट्टीतील लोकांना हाकलून दिले तर आंमचे लोक आत्महत्या करतील, असा इशारा त्यांनी दिला.

जयशीला पोतदार यांनी यावेळी सांगितले कि , 70 घरांचे वाटप केले. परंतु यामध्ये पारदर्शकता नाही. 4 वेळा सर्वेक्षण केले. मात्र त्याचा अहवाल दिला जात नाही. ऑटोनगर व इतर ठिकाणी ज्यांची घरे होती ते लोक येथे आले आहेत. प्रत्यक्षात झोपडपट्टीत राहणाऱ्यांना घर मिळाले नाही. दोनदा आयुक्तांकडे गेलो पण उपयोग झाला नाही. आज ते सर्व्हे करायला आले आहेत, असे ते म्हणाले.

सर्वसाधारणपणे सधन आणि ज्याची घरे आहेत त्यांनाच घरे वाटप केल्याचा आरोप सरकारवर होत आहे. या वेळी झोपडपट्टीच्या रहिवाशांनी अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केल्याचे दिसून आले.

Tags:

shrinagar-ashray-houses-inspection-by-corporation-and-slum-board/