२०१८ साली सरकारने जाहीर केलेल्या पीक कर्ज माफीत निपाणी तालुक्यातील भोज गावातील ८३ हुन अधिक शेतकरी वंचित आहेत. सदर शेतकऱ्यांचे कर्ज माफ न करण्यात आल्याने आज निपाणी पीकेपीएस समोर ठिय्या मांडून शेतकऱ्यांनी उपोषण केले.

२०१८ साली तत्कालीन कुमारस्वामी सरकारने शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी देऊन प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर १ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली होती. मात्र निपाणी तालुक्यातील सुमारे ८३ शेतकरी सरकारच्या या सुविधेपासून गेल्या चार वर्षांपासून वंचित असून कर्जमाफीचा कोणताही लाभ या शेतकऱ्यांना मिळाला नाही. याविरोधात पीकेपीएस सहकारी संघाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडून उपोषण केले.

आंदोलनाची माहिती मिळताच चिकोडी जिल्हा शेतकरी संघाचे अध्यक्ष राजू पोवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये यासाठी सरकार दरबारी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याचप्रमाणे चिक्कोडी सहकारी संघाचे सहाय्यक संचालक एम.एस.गौडप्पनवर, सहाय्यक अमित शिंदे यांनीही आंदोलन स्थळी भेट देऊन समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले.
यावेळी पीकेपीएस अध्यक्ष अदगौडा पाटील, सचिव राजू पाटील, निपाणी तालुका शेतकरी संघाचे कार्याध्यक्ष रमेश पाटील, एकनाथ सादळकर, धन्यकुमार चौगुले, जिनगौडा पाटील, शीतल बागे, शाहू मिठारे, शशिकांत नरदगे, जिनगौडा बेडकिहाळ, निंगौडा पाटील, पदमाकर टाकळे, श्रीकांत साळुंके, राजेंद्र मुगळे, संजय कमते आदी उपस्थित होते.


Recent Comments