National

टीम इंडियाची भारतीयांना दिवाळी गिफ्ट ! ४ गडी राखत भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा !

Share

ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेची धूम आहे. आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट दिलं आहे. या सामन्यात भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली चांगलाच

तळपला आहे. दरम्यान, भारताने चार गडी राखून हा सामना जिंकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशातील महत्त्वाच्या नेत्यांनी ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
विराट कोहलीच्या वादळी खेळीमुळे भारताने चार गडी राखत पाकिस्तानला धूळ चारली. दिवाळीच्या मुहूर्तावर भारताने हा दणदणवीत विजय मिळवल्यामुळे देशातील नेत्यांनीही भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिवाळीला आता सुरुवात झाली, असे म्हणत टीम इंडियाची वाहवा केली.

 

“टी-२० विश्वचषकाची ही योग्य सुरुवात आहे. दिवाळीला सुरवात झाली आहे. विराट कोहलीने अत्यंत उत्तम खेळ केला. भारताच्या पूर्ण संघाचे अभिनंदन,” असे अमित शाह म्हणाले आहेत.

Tags: