Haveri

भारत कोण जोडला आणि कोण तोडला हे सर्वांना माहीत : बोम्मई

Share

भारत कोण जोडला आणि कोण तोडला हे सर्वांना माहीत आहे, असे सांगत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार प्रहार केला.

हावेरी येथील सी. बी. कोल्ली पॉलिटेक्निक कॉलेज मैदानाच्या हेलिपॅडवर उतरल्यावर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसच्या जोडो अभियानावर मुख्यमंत्र्यानी प्रतिक्रिया दिली. अभियानाचे फलक फाडण्यात आल्याच्या डीके शिवकुमार यांच्या आरोपावर, डीकेना काय म्हणायचे ते म्हणू द्या, ज्याला फ्लेक्स लावायचे असतील त्यांनी परवानगी घ्यावी. भाजपला कोणत्याही राजकीय पक्षाचे फ्लेक्स फाडायची गरज नाही. लोकांना सर्व काही माहित आहे. त्यामुळे त्याची गरज नाही असे मला वाटते.

पीएफआयवर बंदी घातली हे चांगले झाले. एसडीपीआय हा भारतीय निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्ष आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यावर बंदीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. आगामी काळात त्यांच्या कारवायांच्या आधारे कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. भारत जोडो कार्यक्रमासाठी साहित्यिक-लेखकांच्या पाठिंब्यावर प्रतिक्रिया देताना, लेखक देशाच्या दोन्ही बाजूला आहेत. त्यामुळे काही तिकडे पाठिंबा देतील, काही इथे पाठिंबा देतील, असे सीएम बोम्मई म्हणाले.

बीके हरिप्रसाद ज्यांनी पीएफआय बंदीला एक राजकीय स्टंट आणि निवडणुकीची नौटंकी म्हटले त्याचा वेगळा अर्थ लावता येईल. इतकी वर्षे तोडफोडीच्या घटना आपल्यासमोर घडल्या आहेत. खून आणि दहशतवादाच्या कारवायांचे त्यांनी समर्थन केले आहे. हरिप्रसाद यांनी विचार करायला हवा की जे लोक काँग्रेसच्या विधानसभेत बंदी घालू म्हणत होते त्यांची नौटंकी म्हणणे कितपत योग्य आहे असा पलटवार बोम्मई यांनी केला.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना तेथील कन्नड भवनासाठी दोन एकर जागा देण्याचे पत्र लिहिले आहे आणि आम्ही त्यांच्याशी बोललो आहोत. ते ठिकाण निश्चित करणार असून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या हावेरी साहित्य संमेलनाची सर्व तयारी सुरू आहे असे बोम्मई म्हणाले.

Tags:

cm bommai haveri