Belagavi

रस्त्यात खड्डे व रस्त्यावर पतदीपक नसल्यामुळे होत आहेत अपघात

Share

शाहूनगर ते कंग्राळी बुद्रुक येथील रस्त्यावर पथदीप नसल्याने रात्रीच्या वेळी अंधार पसरत आहे त्यामुळे या मार्गावरून ये जा करणे नागरिकांना मुश्किल बनले आहे. त्यातच येथील रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने अपघात घडत आहेत.

 

येथील रस्ता करून चार ते साडेचार वर्षे झाली आहेत मात्र या रस्त्यावर काही वर्षातच खड्डे पडले असल्याने या मार्गावरून जाताना नागरिकांना अपघाताला निमंत्रण द्यावे लागत आहे.

 

एकीकडे अंधार आणि दुसरीकडे खड्डे पडले असल्याने या मार्गावरून जाताना आणि छोटे मोठे अपघात घडले असून अनेक नागरिक देखील गंभीर जखमी झाले आहेत.

 

ग्रामपंचायतीने याकडे साफ दुर्लक्ष केल्या असल्याने ही समस्या आणखीनच वाढत आहे. त्यामुळे या मार्गावर पहिल्यांदा पथदीप बसवावेत आणि रस्ता सुस्थितीत करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे .

Tags: