Belagavi

मार्कंडेय नदी झाली ओव्हरफ्लो !

Share

पश्चिम घाटात आणि बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे बेळगाव तालुक्यातील मार्कंडेय नदीत पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहेत.

होय, मार्कंडेय नदीत पाण्याची आवक वाढल्याने बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी, अलतगा, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत पाणी शिरले असून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. मार्कंडेय नदीच्या आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. ऊस, भात, मका, भाजीपाला या पिकांसह इतर पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे. याबाबत आमच्या ‘इनन्यूज आपली मराठी’शी बोलताना एका शेतकऱ्याने सांगितले की, राकसकोप्प येथून मार्कंडेय नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. दरवर्षी असेच नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कंग्राळी खुर्द गावाजवळील मार्कंडेय पुलाखाली नदी दुथडी भरून वाहत असल्याचे दृश्य पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. दरम्यान, आमच्या ‘इनन्यूज आपली मराठी’शी बोलताना एका महिलेने सांगितले की, ती नदी पाहण्यासाठी धारवाडहून आली आहे. कंग्राळी खुर्द हे गाव माझे माहेर आहे, पाणी खूप चांगले वाहत आहे. हे पाहणे म्हणजे डोळ्यांना मेजवानी, भरून वाहणारी नदी आणि चहुबाजूंनी हिरवळ असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

एकंदर, पावसामुळे शेतकऱ्यांनी उगवलेल्या पिकांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. तर निसर्गप्रेमी नदी दुथडी भरून वाहताना पाहून आनंद व्यक्त करत आहेत.

Tags: