केंद्र सरकार परिवहन विभागाने चालू वर्षात राज्यातील ३८ कामकाजांना मंजुरी दिली असून या अंतर्गत ८३६ किलोमीटर पल्ल्याच्या राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी ९५४१ कोटींचे अनुदान जाहीर केले आहे.

केंद्र सरकारच्या या कामकाजांतर्गत विजापूर जिल्ह्यासाठी १७१८.६२ कोटी रुपयांचे अनुदान घोषित करण्यात आले आहे. या अनुदानातून २४० किलोमीटर पल्ल्याच्या महामार्गाचा विकास करण्यात येणार असून या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, अशी माहिती विजापूरचे खासदार रमेश जिगजिनगी यांनी दिली.
विजापूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र राज्यातील सीमेवरील माश्याळ, कर्जगी, इंडी, अथर्ग विजापूर आणि कनमडी – तिकोटा असे १३४ किमीचे रस्ते बांधले जात आहेत. यासह सिद्धापूर – अरकेरी – भुतनाळ – विजापूर – तेलसंग क्रॉस, विजापूर – हुबळी या ५६ किलोमीटरच्या फ्लायओव्हरच्या कामकाजाला चालना देण्यात येत आहे.
रस्ते विकास हा देशाच्या विकासाला पूरक असून, दुपदरी, चौपदरी आणि खड्डेमय रस्त्यांच्या विकासासाठी केंद्रातील भाजपचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चालना दिली होती. त्यानंतर आलेल्या सरकारने याबाबत पुरेसे लक्ष पुरविले नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राष्ट्रीय महामार्गांच्या विकासाची जबाबदारी घेतली असून मागासलेल्या विजयपूर जिल्ह्याच्या व्यापारी विकासासाठी या रस्त्याचा विकास महत्त्वाचा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारने पहिल्यांदाच मोठ्या उद्योगांवर भर दिल्याबद्दल खासदारांनी कौतुक केले. विजापूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासासाठी नितीन गडकरी यांच्याकडे आपण निवेदन दिले होते. अवजड वाहनांच्या रहदारीसाठी अवजड रस्ते आणि ओव्हरपासमुळे जिल्ह्याची विकास क्षमता दुप्पट होईल, त्याचप्रमाणे लांब पल्ल्याच्या प्रवासामुळेही रहदारी सुरळीत होईल, जिल्ह्याची प्रतिमा बदलण्यात औद्योगिकतेवर भर दिल्यास महत्त्वाची भूमिका बजावेल, असे ते म्हणाले. विजयपूरच्या चौपदरी रेल्वे मार्गाचे महामार्गात रूपांतर झाल्याने विकासाला नवे रूप मिळेल, अशी अपेक्षा आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.


Recent Comments