शाळेच्या आवारात बसवलेल्या बकऱ्यांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला करून ६ बकऱ्यांना ठार केले. या हल्ल्यात ३ बकरी गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना शिवबसव नगरातील कन्नड शाळेच्या आवारात काळ रात्री घडली.

होय, बेळगाव तालुक्यातील मुतगा गावचे मेंढपाळ नरसू रायप्पा कुंपी आणि अन्य ७-८ मेंढपाळांच्या सुमारे ४०० बकऱ्यांचा कळप मंगळवारी रात्री शिवबसव नगरातील कन्नड शाळेच्या आवारात बसवण्यात आला होता. मध्यरात्रीनंतर अचानक सुमारे २०हुन अधिक भटक्या कुत्र्यांच्या समूहाने बकऱ्यांवर हल्ला चढविला. कुत्र्यांनी ६ बकरी फाडून ठार केली. तर ३ बकरी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
यासंदर्भात माहिती देताना मेंढपाळ निंगाप्पा मल्लप्पा मल्लूगोळ यांनी सांगितले की, मंगळवारी मध्यरात्रीनंतर सुमारे २.३०-३ वा. च्या सुमारास अचानक भटक्या कुत्र्यांच्या कळपाने बकऱ्यांवर हल्ला चढवला. यात ६ बकरी मरण पावली तर ३ बकरी गंभीर जखमी झाली आहेत. यामुळे मेंढपाळांचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, बकऱ्यांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून ६ बकरी ठार केल्याने मेंढपाळ आर्थिक संकट सापडले असून, सरकारने याबद्दल भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.


Recent Comments